Categories: Editor Choice

सांगवीच्या बाबूरावजी घोलप विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ जानेवारी) : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण मापारी, उपमुख्याध्यापिका संजना आवारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मनीषा वळसे याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. गेली दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा, यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षीचा पहिलाच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली.

प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर सुंदर असे कलाविष्कार नृत्य सादर केले. आय लव्ह माय इंडिया, पशु पक्षांचे गाणे, देशभक्ती गीतावर फिर भी दिलं है हिंदुस्थानी, बळीराजावर आधारित शेतकरी गाण्यावर नृत्य, लावण्या, लेझीम थीम, वो कृष्णा है अशा एका हुन एक सरस बहारदार गाण्यांवर नृत्यांचा आविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितांनी उभे राहून नृत्य सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.

कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षिका माधुरी शेलार, अर्चना धुमाळ, रेखा गायकवाड, सारिका शिंदे, शीतल चव्हाण, अलका जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शेळके आणि श्रीमती भारती भागवत यांनी केले. तर मनीषा वळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील कर्मचारी, मावशी आदी शिक्षक शिक्षकेतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक शरद शेळके यांनी स्वतः मुलींना लावण्यांच्या गाण्यावर सराव करून घेतला होता. ती लावणी विद्यार्थिनींनी नृत्या द्वारे वाखाणण्याजोगी सादर केली. यावेळी सर्वांच्या आग्रहास्तव स्वतः शिक्षक शरद शेळके यांनी विद्यार्थिनींसोबत पुन्हा एकदा नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या नृत्याविष्कार पाहून दाद दिली.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असतात. असा वर्षातून एकदा प्लॅट फॉर्म उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळे पुढच्या पिढीला ते शिकण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना वाव मिळतो. यामध्ये विद्यार्थी भविष्यात आपली एखादी ओळख निर्माण करून एखादी उंची गाठण्यासाठी नक्कीच मदत मिळते.
बाळकृष्ण मापारी, मुख्याध्यापक

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 week ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago