महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक : ३० जानेवारी २०२१) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवार, दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी पिंपळे गुरव येथे मौनव्रत पाळले.
दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांनी या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, समीक्षक प्रदीप गांधलीकर, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, प्रकाशक नितीन हिरवे, दिलासा संस्था आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. पी.एस. आगरवाल, वर्षा बालगोपाल, निशिकांत गुमास्ते, आण्णा जोगदंड, रामचंद्र प्रधान, शामराव सरकाळे, भाऊसाहेब गायकवाड, विजया नागटिळक, रघुनाथ पाटील, आय.के. शेख, सुभाष शहा, सुनील सुंदर, मधुश्री ओव्हाळ, सुहास घुमरे, अनिल दीक्षित, फुलवती जगताप या साहित्यिकांसह उपस्थित सर्वांनी एक तासाचे मौनव्रत पाळून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचा समारोप “रघुपती राघव राजाराम” या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आला. प्रथमेश जगदाळे, रामचंद्र प्रधान, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी, प्रकाश घोरपडे, शामराव साळुंखे, मुरलीधर दळवी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…