महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१सप्टेंबर) : पुणे शहरात विज्ञानाशी संबधित राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था आहेत. त्यामुळे भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुणे लगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन हे परिवर्तन करण्यासाठी विज्ञान या विषयाचे अनन्य साधारण आहे. देशाच्या विकासासाठी आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी देशात संगणक व इंटरनेटची सुविधा उभारण्यात आल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचा समाज उन्नतीसाठी उपयोग विचारात घेऊन राज्य स्तरावर विज्ञान अविष्कार नगरीची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
21 व्या शतकातील कौशल्ये, जागतिक नागरिकत्व, उद्योग 4.0 , उद्योजगकता , वैज्ञानिक दृष्टीकोन बहु-अनुशासनातत्मक, अनुभवात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले असून उर्वरीत 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत रु. 191 कोटीची vertical भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…