तसेच नागरिक जा ये करतात त्या भगवान महाश्वेरी चौकाचा नाम फलक आडवा अर्धवट स्थितीत कोसळला आहे, तेथील स्मार्ट सिटीचे काम अतिशय संथ गतीने सूरू आहे, जो भाग काम करून पूर्ण झाला आहे त्या ठिकाणचे कामाचे साहित्य हटविलेले नाही, त्यामुळे फुटपाथ असूनही नागरिकांना कसरत करत जावे लागते आणि हा भाग शहराच्या महापौर आणि प्रभाग अध्यक्ष यांच्या प्रभागात येतो हे महत्त्वाचे तरीही ठेकेदार मंद गतीने काम करत आहेत …
यावेळी मनसेचे प्रभाग अध्यक्ष प्रदीप गायकवाड म्हणाले, “या अर्धवट कामांबाबत ठेकेदारांना कितीही बोलले तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही, निवेदने द्या, तोंडी सांगा, त्यांना लाज वाटत नाही, पदपथाची वाट लागली आहे, येथील प्रभागात महापौर ,सभापती यांचे वास्त्यव्य आहे हे अभियंत्यांच्या खीजगणतीत सुध्दा नाही, मोठमोठा पदभार आहे परंतु काडीची किंमत नाही अशी परिस्थीती झाली आहे, तरी आपली जबाबदारी ओळखा आणि या माजूरड्या अभियंत्यांना प्रतिनिधींनी भानावर आणावे आणि नागरिकांची या जाचातून सुटका करावी हीच अपेक्षा.
वास्तविक महापौरांना संपूर्ण शहरात लक्ष द्यावे लागते, त्यांच्या मागे असणारा कामाचा व्याप पाहता याही वयात त्या खूप धावपळ करतात त्यांनी ठेकेदारांना वारंवार या गोष्टी बाबत सूचना दिल्या आहेत, परंतु हे ठेकेदार तरीही या गोष्टी गंभीरपणे का घेत नाहीत हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ठेकेदारांच्या या काम करण्याच्या पद्धतीने राजकारण तापत चाललंय त्यात सामान्य नागरिक भरडला जातोय हे नक्की!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…