Google Ad
Uncategorized

खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : मुसळधार पावसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत शाळांना सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले आहे.

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत.

Google Ad

जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील.

हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशीत करण्यात आले आहे.

राज्यात जिथं-जिथं आवश्यकता आहे, तिथं एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महापालिका, जिल्हा प्रशानाच्या सर्व यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यतकता भासेल तिथं मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लोकांना त्रास होऊ नयेत या दृष्टीनं सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय लवकर बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!