Google Ad
Uncategorized

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवडला एकही पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे आण्णा बनसोडे यांच्या रूपाने महायुती सरकारने पिंपरी-चिंचवडकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहराला २५ वर्षानंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या पदावर संधी मिळाल्याने पवार गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली आहे. २०१९ च्या अजित पवारांच्या भाजपशी झालेल्या पहिल्या शपथविधीपासून तर, २०२३ च्या सत्तासंघर्षाच्या काळात बनसोडे अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिले. बनसोडे यांनी सुरुवातीला २००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविली. विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले. त्यानंतर २०१९ बनसोडे पुन्हा विजयी झाले. २०२४ च्या पिंपरी विधानसभा निवडणुकीमध्ये बनसोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या एका गटाने थेटपणे विरोध केला होता. तर भाजपनेही या जागेवर दावा केला होता, असे असतानाही त्यांच्या पाठीशी अजित पवार ठामपणे उभे होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्रित येऊन नाराजांची समजूत काढली होती. बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात विरोधात असणारे राष्ट्रवादीतील स्थानिक नेते आणि भाजपतील नेतेही बनसोडे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. पिंपरी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर बनसोडे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिपदाऐवजी मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या विधानसभा उपसभापती पदी संधी मिळाली आहे.

Google Ad

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शहराचे नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर २००३ मध्ये प्राध्यापक मोरे यांचे निधन झाले आणि काँग्रेसची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे काँग्रेसचे मोहरे फोडून अजित पवार यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास सुरुवात केली. पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!