महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) :- सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे व मराठवाडा जनाविकास संघ पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील इर्शाळ वाडी आपत्ती ग्रस्त कुटुंबांना साहित्याची मदत करण्यात आली.
यावेळी सातारची कन्य आमदार ‘श्रीमती अश्विनी जगताप’ यांचा मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी सातारा मित्र मंडळाला यासाठी आवाहन केले होते त्याप्रमाणे आज मंडळाने त्याची पूर्ती केली. असे सातारा मित्र मंडळ सांगवी चे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी सांगीतले. मंडळ स्थापन होऊन सहा वर्ष झाली व मंडळाचे ब्रीद वाक्य आहे ‘समाज सेवा हीच ईश्वर सेवा‘ आहे.
त्याप्रमाणे मंडळाने या सहा वर्षात अनेक पूरग्रस्तांना, लोकबिरादरीला, गरीब होतकरू विद्यार्थ्याना व लोकांना,आश्रमाला आर्थिक व सामाजिक मदत केली आहे. या मदती साठी मराठवाडा जनविकस संघाचे अध्यक्ष, समाजसेवक व वृक्षमित्र अरूण पवार, व सातारा मित्र मंडळाचे सदस्य व उद्योगपती सूर्यकांत गोफणे व मंडळाच्या सदस्यांचे मोलचे सहकार्य लाभले.
इर्शाळवाडी साठी देण्यात आलेल्या साहित्यामध्ये ४० ब्लँकेट,९० रजई, १०० सतरंज्या,८० बेडशीट,६० टॉवेल,४० सॉक्स,२५ सॅक,११ छत्री,४०० साड्या,७० महीला व मुलींचे ड्रेस,६० लहान मुलांचे ड्रेस,५० स्वेटर,३० नॅपकीन इ. साहित्य होतें असे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…