महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला ‘राष्ट्रमाता’ असा सन्माननीय दर्जा प्राप्त व्हावा, या उद्देशाने भारतातील स र्व वरिष्ठ साधू-संतआणि गोभक्तांनी मिळून एक निःस्वार्थ अभियान सुरू केले आहे
॥ सेवा ॥ ॥ सुरक्षा ॥ ॥ सम्मान ॥
गो सम्मान आव्हान अभियान

या अभियानाचे अध्यक्ष स्वतः नंदी महाराज आणि गोमाता आहेत. तसेच, भारतातील सर्व संत, सनातनी हिंदू आणि गोभक्त यात कार्यकर्ते म्हणून सेवा देत आहेत.
२७ एप्रिल २०२६ रोजी भारतातील सर्व ५५०० तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन दिले जाईल. या निवेदनासोबत आपल्या सर्वांच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्याही जोडल्या जातील.
सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता
स्थळ : दुर्गा माता मंदिर, साईनाथ नगर, निगडी
मोठ्या संख्येने एकत्र येत, नामसंकीर्तन करत आणि शांततापूर्वक पदयात्रा काढत आपण पिंपरी-चिंचवड तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करणार आहोत.
आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे अभियान यशस्वी करावे ही विनंती. गोमातेची हत्या थांबवण्यासाठी या निःस्वार्थ अभियानासाठी तुम्ही दिलेला ‘एक तास’ नक्कीच मोलाचे सहकार्य ठरेल.

















