गृहसजावट करताना ‘या’ गोष्टींचा वापर टाळणे हिताचे; जाणून घ्या

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रत्येकाच्या स्वप्नात आपले असे एक घर असते. आपला अनुभव, निरीक्षण, इच्छा, अपेक्षा यांनुसार आपले घर सजवत असतो. छोट असलं, तरी ते घर टापटीप, नेटके ठेवण्याचा प्रयत्न जो तो करत असतो. महिलांना तर गृहसजावटीची विशेष आवड असते. अगदी छोट्यातील छोटी गोष्टही लक्षात ठेवून आपलेपणाने ती प्रत्यक्षात आणण्याचा गृहिणींचा कल असतो.

भारतीय संस्कृतीत महाभारत हा पवित्र ग्रंथ मानला गेला आहे. महाभारताची मोहिनी युगांनंतरही आपल्यावर असलेली पाहायला मिळते. महाभारत युद्ध हा, तर अनेकांच्या अभ्यासाचा विषय. याच महाभारत युद्धाची सुप्रसिद्ध तसबीर अनेकांच्या घरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा अनेकांची तशी इच्छा असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार, महाभारत युद्धाची तसबीर घरात लावू नये, असे सांगितले जाते. महाभारत युद्ध कलह आणि हिंसेचे प्रतीक आहे. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या गाजलेल्या या महाभारत युद्धाच्या तसबिरीचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबात कलह, वाद वाढू शकतात, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, कब्रस्तान किंवा समाधी स्थळ दिसत असलेल्या तसबिरी घरात लावू नयेत, असे सांगितले जाते. एखाद्या चित्रात कब्र किंवा समाधी दिसत असल्यास ते चित्र किंवा तसबीर घरात लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढीस लागतो. कुटुंबातील सदस्यांनाचे नकारात्मक विचार वाढीस लागू शकतात. मानसिक शांतता भंग होऊ शकते. त्याचप्रमाणे अशा तसबिरी लावल्यामुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ शकते, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात हिंसक तसबिरी लावू नयेत, असे सांगितले जाते. एखाद्या चित्राकडे पाहून ते हिंसक प्रवृत्तीचे द्योतक आहे, असे वाटल्यास ते चित्र तात्काळ काढून टाकावे, असे सांगितले जाते. अशा तसबिरींमुळे घरातील लहान मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरात वाद, भांडणे, मतभेद वाढीस लागू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच काही जण बुडते जहाज असलेल्या तसबिरी गृहसजावट करताना शोभेच्या वस्तू म्हणून लावतात. काही जण टायटानिक जहाजाचा फोटो लावतात. मात्र, अशी चित्रे नकारात्मक संदेश देत असल्यामुळे घरात लावू नयेत, असे सांगितले जाते.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago