Google Ad
Uncategorized

पालखी सोहळ्यात इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर तर्फे मोफत आरोग्य शिबिर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ जून : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात झाली. देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आणि त्या पुण्यातून पुढे मार्गस्थ आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

वारीत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. पुणे शहरातून पालखीचं प्रस्थान होत असल्याने त्यासाठी पुण्य नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.

Google Ad

आज दिनांक 13 जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी होता. या सोहळ्यानिमित्त पुणे इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये वारकऱ्यांना मोफत इलेक्ट्रो होमिओपॅथी औषधोपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये साडेतीनशे वारकऱ्यांना औषधोपचार करण्यात आला. या शिबिराला वारकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये डॉ. डी डी शहा,बापू दगडे, श्रीनिवास राव ,अशोक जगदाळे, प्रतिमा सिंग ,मोहन रायकर, सुनील आंगणे ,पांडुरंग कांबळे आणि हेमंत कुंडले यांनी औषधोपचार केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!