Categories: Uncategorized

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा … महायुतीचं अखेर ठरलं! कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र14 न्यूज,दि.२६ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने थेट 200चा टप्पा पार करत निर्विवाद बहुमत मिळविले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा तसेच शिवसेनेकडून दावे करण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड करायची, याचा निर्णय राजधानी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी करणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपाने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये भाजपाचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. हे सारे यश देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळेच मिळाल्याने ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतात, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. 178 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

मात्र, ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे भाजपाकडे असेल आणि त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आणि भाजपाने एकत्रितरित्या विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र, जदयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. हाच बिहार पॅटर्न राज्यातही लागू करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

7 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

2 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

2 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago