Categories: Uncategorized

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा … महायुतीचं अखेर ठरलं! कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र14 न्यूज,दि.२६ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने थेट 200चा टप्पा पार करत निर्विवाद बहुमत मिळविले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा तसेच शिवसेनेकडून दावे करण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड करायची, याचा निर्णय राजधानी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी करणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपाने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये भाजपाचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. हे सारे यश देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळेच मिळाल्याने ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतात, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. 178 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

मात्र, ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे भाजपाकडे असेल आणि त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आणि भाजपाने एकत्रितरित्या विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र, जदयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. हाच बिहार पॅटर्न राज्यातही लागू करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

4 days ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 month ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago