Categories: Uncategorized

लॉक डाऊनवरून बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला ‘ठाकरे सरकारला’ आंदोलनाचा इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना लॉकडाऊनवरुन बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे . आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो , सगळं काही सुरू करा . आमचा अंत पाहू नका , आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका . कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं . रामभरोसे थांबवावं , अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू , असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत . तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं , असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे .

कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत . त्यामुले कोविडचा परिणाम आहे का नाही , याचा विचार करण्याची गरज आहे . पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले , यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले . मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले , तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली . केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं . तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी , अशी मागणीही त्यांनी केली .

अशा परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार ? दुकानं कधी उघडणार ? एसटी बस कधी सुरू होणार ? राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय , कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार ? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे , असं असताना ९ ५ टक्के लोकांना वेठीला का धरता ? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे . कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणं चुकीचं आहे . कोविडमुळे पास झाला , असे व्हायला नको . यावर्षी नाही , पुढच्यावर्षी परीक्षा घ्या , पण घ्या , असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे .

कोरोना लॉकडाऊनवरुन बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे . आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो , सगळं काही सुरू करा . आमचा अंत पाहू नका , आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका . कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं . रामभरोसे थांबवावं , अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू , असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत . तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं , असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago