महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय असे असतानाच शहरातील वाकड , पिंपळे निलख , विशाल नगर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांनी सदनिका विकत घेतल्या आहेत .पण कधी पाण्याचा प्रश्न तर कधी विजेचा ही गोष्ट आता नित्याचीच झाली आहे, असे येथील नागरीक सांगतात. या विजेच्या होणाऱ्या लपंडावास वाचा फोडण्यासाठी स्थानिक नगरसेवक तुषार कामठे आणि आरती चौधे यांनी पिंपळे निलख येथे ‘जनता दरबार’ घेतला.
या भागातील सोसायट्यांमध्ये पुरेसा विद्युत पुरवठाच होत नाही . त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होत आहे . आठवड्यातील पाच दिवसदेखील अखंड वीज पुरवठा होत नसल्याने मुलांचा ” ऑनलाइन अभ्यासाचे बारा वाजले आहेत, तर दुसरीकडे ” वर्क फ्रॉम होम ‘ करणारा नोकरदारवर्ग वैतागला आहे . या सदनिकाधारकांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा कधी होणार ? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. यावर महावितरणकडून ना ठोस कार्यवाही , ना उपाययोजना निव्वळ आश्वासने मिळत आहेत , अशा तक्रारी नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…