लॉक डाऊन हटवण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यून : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन करुनही राज्यातला कोरोनाचा हाहाकार काही थांबला नाही. रोज कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशात सगळी शहरं आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण संपूर्ण लॉकडाऊन कधी हटवण्यात येणार हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. पण राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत लॉकडाऊन उठवण्याची काही घाई नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उलट जिथे लॉकडाऊन उठवण्याची घाई करण्यात आली तिथे पुन्हा लॉकडाऊन केलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गाबद्दल नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे. खरंतर कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कोरोनाची पहिली लाट आली आहे पण आता दुसरी लाट येऊ द्यायची नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत असताना शनिवारीही राज्यात रुग्णांचा मोठा आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 12614 नवीन रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 322 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 584754 वर पोहोचली आहे. यापैकी 156409 सक्रिय रुग्ण असून राज्यात 408286 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago