महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरूच असून धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरणार असून धरणातून रविवारी ( ३० ऑगस्ट ) सकाळी ९.०० वाजले पासून तीन हजार कयुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका असताना ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पवना धरण ९६ टक्के भरले आहे. लवकरच धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांनी खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. नदी तीरावरील सर्व साधनसामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही याची काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…