महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मधील दापोडी येथील गणेश नगर व पुणे मुंबई हायवेला जोडणारा भाई कोतवाल उड्डाणपुलाच्या वळण असलेल्या भागावरील रस्त्यावरील डांबर निघुण गेल्यामुळे रस्तापुर्णपणे अपघातास निमंत्रण देणारा असा झालेला आहे, तेथे चढ व लगेच उतार असल्यामुळे वाहनाचा वेग जास्त असतो, तसेच त्यामुळे रस्त्यावर असलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने व खडी निघाल्याने वळणावर दुचाकी घसरून अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत.
त्यामुळे त्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण महानगरपालिकेने करावे. त्याकरिता निवेदन ‘ह’ प्रभाग चे सहाय्यक आयुक्त हराळ यांना दिले व चर्चाही झाली यावेळी काम करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी (मनसे उप विभाग अध्यक्ष -अलेक्स अप्पा मोझेस, दिलीप ठोंबरे) वॉर्ड अध्यक्ष सागर भोकरे, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, प्रशांत सांगळे, मनसे सैनिक-सतीश मात्मार्थी पंकज ओव्हाळ उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…