Categories: Editor Choice

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात … संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे

मानवता हाच श्रेष्ठ धर्म होय
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

युगानुयुगे संतांचा हाच संदेश राहिला आहे, की आपण मनुष्य देहात आलो आहोत तर मनुष्य बनून जगावे. हे जे श्वास मिळाले आहे ते मर्यादित असून अनमोल आहेत. ते असेच वृथा दवडू नयेत. आपल्या हयातीतच या श्वासांचा आणि जीवनाचा सदुपयोग करायचा आहे. आपले जीवन मानवी गुणांवर आधारित ठेवून खऱ्या अर्थाने मनुष्य व्हायचे आहे. मानवतेहून श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. ज्या मानवाचे जीवन मानवी मूल्यांनी युक्त आहे तो जगासाठी एक वरदान आहे. आपण आपले जीवन संतांच्या वचनांवर आधारित करावे. जेव्हा आपण सत्संसगामध्ये येतो तेव्हा आपण सत्याशी संलग्न राहतो आणि जी वचनं आपल्याला श्रवण करायला मिळतात ती जीवन जगण्याची कला शिकवतात. सत्संगामधून प्राप्त केलेल्या लहान-सहान गोष्टी जरी अंगीकारल्या आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच या मनामध्ये परिवर्तन घडून येते आणि आपण स्वयमेव चांगल्या मार्गावर अग्रेसर होण्यास प्रेरित होतो. आपण आपल्या मनात लपलेल्या निंदा, द्वेष यांसारख्या वाईट गोष्टी असतील किंवा कोणाला हीन दृष्टीने पाहण्याची वृत्ती असेल तर या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत. एखादी व्यक्ती आपल्याला कठोर शब्द बोलली तर तिच्याशी आयुष्यभर बोलणार नाही अशा प्रकारची भावना आपल्याला आणखी संकुचित करते. याउलट आपण आपले मन विशाल करायचे आहे. जरी कोणी आपल्याबरोबर वेगळा व्यवहार केला असेल तरीही आपण त्याला चांगुलपणाच दाखवायचा आहे. जसे शेख फरीदजी यांच्या या ओळी आहेत,

की-फरीदा बुरे दा भला कर, गुस्सा मन दा ना हंडाई।
जरी कोणी वाईट करत असेल तरीही त्याचे आपण भलेच करायचे आहे. कदाचित असे करणे त्यावेळी अवघड वाटू शकते. मानवी स्वभावामुळे जर कोणी काही चुकीचे बोलले तर समोरचा मनुष्यही उलटून काहीतरी कटू वचनं बोलतो. अशा वेळी या परमात्म्याला आठवावे. कोणी जरी काही वाईट केले असेल तरीही आपण आपल्यातील जो चांगुलपणा आहे तो टिकवून ठेवायचा आहे, आपल्या शब्दांतून चांगलीच भावना व्यक्त करायची आहे.

आपले बोल, व्यवहार आणि विचार संतमतीनुसार असावेत. आपल्या मनामध्ये क्रोध किंवा असूया उत्पन्न होऊ नये. आपल्या बोलांनी कोणाचे मन दुखावले जाऊ नये ज्यामुळे तो दिवसभर तीच गोष्ट मनात ठेवून बसेल. आपण तेच कार्य करायचे आहे जे संतांनी शिकवले आहे. कोणाला दुखवू नये, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणू नये. समोरच्याचा कितीही वेगळा स्वभाव असला तरी ज्याचा जसा स्वभाव असेल तसा स्वीकारायचा आहे. आपण असेच मानायचे आहे, की ईश्वराने सृष्टीची रचना इतकी वैविध्यपूर्ण केलेली आहे, की कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूसमान असत नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

6 hours ago

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ता रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला … अजित दादा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…

2 days ago

राखीच्या धाग्याने विणला ‘बहीण भावाच्या’ नात्याचा विश्वास’! पिंपळे गुरव येथे सौ पल्लवी जगताप यांच्या कडून अंध अनाथ कल्याण केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…

2 days ago

आमदार ‘शंकर जगताप’ यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात ७५३ तक्रारींचे निराकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…

3 days ago

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…

3 days ago

पिंपरी चिंचवड अग्निशामक दलात अत्याधुनिक ड्राय केमिकल पावडर वाहनाची भर

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…

3 days ago