महाराष्ट्र 14 न्यूज : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची बदनामी करणारे बिडी उत्पादन बंद करावे अशी शिवधर्म फाउंडेशननी मागणी केली असून महाराष्ट्रात 15 जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाला निवेदन दिली आहेत. तसेच मुंबई हायकोर्टात छत्रपती संभाजी बिड़ी वरील धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात यावे यासाठी 1 रीट एप्लिकेशन दाखल करत आहोत. असेच ही शिवधर्म फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपकआण्णा सिताराम काटे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचं युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नावं,फोटो देखील वापरले जात आहेत. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना शिवधर्म फाउंडेशनच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या वतीने यासंदर्भात निवेदन दिले जात आहे. महाराष्ट्रात आणि भारतात हिंदू देवदेवता आणि राजे-महाराजे यांच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक गोष्टींना नाव देऊन त्याचा अपप्रचार , अपमान केला जातो. हे इथूनं पुढं खपुनं घेतलं जाणार नाही असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दिपकआण्णा सिताराम काटे यांनी पत्रकारांना सांगितले.
संभाजी बिडी असो किंवा अजून कोण असो इथून पुढं भारतदेशाचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राच्या युवकांचे ह्रदय सम्राट, युवकांचा मान ,अभिमान , स्वाभिमान धर्मवीर संभाजीराजे बद्दल बदनामीकारक व त्यांचा नावाचा वापर करून कोणी व्यवसाय करत असेल किंवा व्यसनासारख्या गोष्टीला नाव देऊन धंदा करत असेल हे खपवून घेतले जाणार नाही.
त्यामुळे आत्ता संभाजी बिडी या उद्योगावर शासन काय कारवाई करते का ? आणि शासन कारवाई करणार का ? अन्यथा शिवधर्म फाउंडेशन आपल्या स्टाईलने आंदोलन करणार आणि होणाऱ्या परिणामाला नेमकं कोण जबाबदार कोण ? अशी सध्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे. यासंदर्भात शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दिपकआण्णा काटे यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता सांगितले की, आम्ही कायदा मानणारी, घटने जो आम्हाला आंदोलन , उपोषण करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे.
आणि घटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही शांततेत निवेदन दिली आहेत ,शांततेत आंदोलन करणार आहे पण आमच्या आंदोलनाची दखल न घेतली गेली नाही तर आम्ही शिवधर्म फाउंडेशन स्टाईलने आंदोलन करून त्याला जबाबदार सर्व शासन व संभाजी बिडी उद्योग समूह असेल असा आहे त्यांनी इशारा दिला आहे.
तसेच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीनेही आम्हांला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…