महाराष्ट्र 14 न्यूज : करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत असलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून असलेली संचारबंदी कमी झाल्याने नागरिकांना रात्रीही फिरता येणार आहे . पुणेकरांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे . राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर २४ मार्चनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते . पूर्ण राज्यात २४ तास संचारबंदी लागू करण्यात आली होती .
त्यानंतर एक जून पासून दिवसा असलेली संचारबंदी कमी करून फक्त रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी ठेवण्यात आली होती . रात्री संचारास प्रतिबंध घालण्यात आला होता . आता शासनाने एक ऑगस्टपासून संचारबंदीचा कोणताही आदेश काढलेला नाही . त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता . पण , रात्रीची संचारबंदी शासनाने मागे घेतल्यामुळे आदेश काढण्यात आला नसल्याचे समोर आले आहे . तरीही नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये . आवश्यक असेल तरच बाहेर पडावे , असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…