महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.४ ) : जनता शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यामंदिर औंध प्रशालेत आज ५ वी ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. कित्येक महिन्यांनी शाळा भरल्यावर ‘घरट्यातून उडून गेलेली पाखरे परत घरट्यात आली, किलबिल चालू झाली’ अशी भावना प्रत्येक शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
शाळा व्यवस्थापनाकडून करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. जवळपास दहा महिन्यानंतर शाळेत येता आल्याने व शिक्षकांची प्रत्यक्ष भेट झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नेहमीच्या तुलनेत थोडी कमी होती. विद्यार्थी वाहतुकीबाबत निर्णय झाल्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल.
यावेळी प्राचार्य विश्वास जाधव, उपप्राचार्य राजू दिक्षित, पर्यवेक्षिका भारती पवार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख बिपीन बनकर, मिनल घोरपडे, सुधाकर कांबळे,कांचन घुले , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…