महाराष्ट्र 14 न्यूज : पैसे चोरी केल्याच्या संशयावरुन पान टपरी चालकाने आपल्या साथीदाराची हत्या केली. ही घटना कल्याण येथे घडली. मित्राने मित्राची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुनील पटेल असं आरोपीचे नाव आहे. तर सूरज पाल असं मृताचे नाव आहे . आरोपी आणि मयत हे दोघे उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्हा येथे राहणारे आहेत. 21 ऑगस्टच्या रात्री पैसे चोरीच्या संशयावरून सुनीलने सूरजला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. त्यांचा मृतदेह कल्याण शीळ रोड वरील क्लासिक हॉटेलच्या बाजूला असलेल्या तलावात फेकून दिला.
सुनीलने सूरजची हत्या केल्यानंतर परिसरातच या घटनेची माहिती पसरली. या हत्येची कुणकुण कल्याण क्राईम ब्रांचला लागली. त्यानंतर त्यानी या हत्येचा शोध घेण्यास सुरुवात केली. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने या प्रकरणी सखोल तपास करून मयत सूरज चा मृतदेह शोधून काढला आणि हत्येचा आरोपी सुनील पटेलला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नसताना क्राईम ब्रांचने या हत्येचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
हत्येनंतर चार दिवसांपासून सूरज बेपत्ता आहे. मात्र कुणी शोध घेत नाही. सुनीलने सुरजचा खून केला आहे ही चर्चा विभागात पसरली होती. कल्याण क्राईम ब्रांचने जेव्हा सुनीलला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हा प्रकार समोर आला. सुनील हा कल्याण क्राईम ब्रांच कार्यालयसमोर अनेक वर्षांपासून पान टपरी चालवतो.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…