Categories: Uncategorized

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ मार्च २०२३:- यशवंतराव चव्हाण हे प्रागतिक व आधुनिक विचारसरणीचे महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून राज्य सक्षम करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस त्याचप्रमाणे पिंपरी येथील वल्लभनगर एस.टी.स्टँडजवळील आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमास वाय.सी.एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्यधिकारी बाबासाहेब कांबळे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले यशवंतराव चव्हाण यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नेतृत्व केले. केंद्रसरकारमध्ये उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच परराष्ट्रमंत्री अशी महत्वाची पदेही त्यांनी भूषविली, तर काही काळ ते विरोधी पक्ष नेतेही होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाडा आताचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तसेच कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्कृती महामंडळे, विश्वकोश मंडळे आदी संस्थांच्या स्थापनेसाठी यशवंतराव चव्हाण यांचा सहभाग असल्याचेही  अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago