महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर देखील बंधने आले आहेत. त्यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा अनेक सण लोकांना घरच्या घरीच साजरे करावे लागले. मे महिन्याची सुट्टीतही अनेकांना गावाला जाता आले नाही. अशा परिस्थितीत सर्व चाकरमानी निदान गणेशोत्सवासाठी जरी कोकणात जायला मिळेल याची वाट पाहत होते. मात्र रेल्वे बंद असल्यामुळे अनेकांना वाहनाने गावाला जावे लागत आहे. मात्र सर्वांनाच ते परवडण्यासारखे नसून ज्यांचे स्वत:चे वाहन नाही त्यांना गावी जाणे मुश्किल झाले होते. म्हणून विशेष रेल्वे गाड्या सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.
अशा परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे हे चित्र बदलले होते. मात्र लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आता या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडजण्यात येणार आहेत. एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता विशेष रेल्वेही कोकणासाठी धावतील.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…