महाराष्ट्र 14 न्यूज : २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५६ मिनिटांपर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
या विषयी अधिक माहिती देतांना श्री. सोमण म्हणाले की ज्यांना या वेळेत गणेशस्थापना करता येणार नाही त्यांनी त्यादिवशी पहाटे पाच पासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेशस्थापना केली तरी चालेल. यावर्षी कोरोनाची साथ आहे. सर्वांनी गणेशोत्सव साधेपणाने पण मोठ्या उत्साहाने साजरा करावा. कोरोना प्रतिबंधक उपाय व शिस्त यांचे कसोशीने पालन करावे. गणेशमूर्ती आकाराने लहान आणि मातीची असावी. स्वत: माती आणून जमेलतशी गणेशमूर्ती तयार केली तरी चालेल.
गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत करावे. कृत्रिम तलावाचा वापर करावा. गर्दी करू नये. यावर्षी मंगळवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर गौरी आणावयाच्या आहेत. बुधवार २६ ऑगस्ट रोजी गौरीपूजन आहे. गुरुवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३६मिनिटांनंतर गौरी विसर्जन करायचे आहे. यावर्षी मंगळवार १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…