Categories: Uncategorized

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा … महायुतीचं अखेर ठरलं! कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र14 न्यूज,दि.२६ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने थेट 200चा टप्पा पार करत निर्विवाद बहुमत मिळविले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा तसेच शिवसेनेकडून दावे करण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड करायची, याचा निर्णय राजधानी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी करणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपाने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये भाजपाचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. हे सारे यश देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळेच मिळाल्याने ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतात, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. 178 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

मात्र, ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे भाजपाकडे असेल आणि त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आणि भाजपाने एकत्रितरित्या विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र, जदयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. हाच बिहार पॅटर्न राज्यातही लागू करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे…

2 weeks ago

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे -- ​पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण…

3 weeks ago

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील…

4 weeks ago

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

1 month ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा…

1 month ago