या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवनकुमार बनसोड यांनी वेगाने तपास सुरू केला आणि घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. हत्येअगोदर कैलास गायकवाड यांनी शिरपूर येथे सायंकाळी भाजीपाला आणि दूध घेतले होते. त्यांनंतर ते आपल्या गांवी दुधाळा येथे जात असताना कट रचून पंढरी देवबा गायकवाड,शंकर उर्फ सुनील भगवान साखरे, हरिभाऊ आनंदा गायकवाड या तिघांनी एका हॉटेल जवळ त्यांना बोलवलं.
मनात राग असलेल्या या तिघांनी अतिशय निर्दयीपणे धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून कैलास गायकवाड यांना ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील 2 आरोपी हे मृतकाच्या नात्यातीलच असल्याचं समजते. दरम्यान, धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…