महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्यात किती मॅच्युरिटी आहे हे लोकांना आधीपासूनच माहीत आहे. पार्थ यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची मॅच्युरिटी किती, याची माहिती त्यावेळी नव्हती का ?, असा प्रश्न भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी उपस्थित केला आहे. राजकीय जीवनात अनेकांना आपली मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार हे तर पवार कुटूंबातील आहेत. पार्थ पवारांना या प्रकरणात काहीतरी असत्य आहे, असे वाटत असेल त्यामुळे त्यांनी सत्यमेव जयते हा नारा दिला असावा, असेही बापट यांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी सुरू होईल. याप्रकरणात कोण आहे, कोण नाही, हे सत्य बाहेर येईल. सुशांतसिंह प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नाही. सत्य लोकांसमोर येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल आमच्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे खासदार बापट म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…