महाराष्ट्र 14 न्यूज, दि.04 मे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. सुनेत्रा पवारांनी दिवंगत अजित पवारांचे रेकॉर्ड देखील मोडीत काढत मोठे मताधिक्य मिळवलं आहे. देशात सर्वाधित मतांनी निवडून येणाऱ्या आमदार सुनेत्रा पवार झाल्या आहेत.
या सगळ्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी केलेल्या विकासकामांचे प्रतिक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहे, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित पवारांनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अशापद्धतीने निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे मला कधीच वाटले नव्हते. मन खूप भरून येत आहे. अजित पवारांनी केलेल्या विकासकामांचे प्रतिक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहे. अजित पवारांनी जनतेवर केलेले प्रेम, सेवा ही बारामतीकरांनी मतातून दाखवली आहे.”
“बारामतीकरांनी केलेल्या मतातून अजित पवारांवरचा आढळ विश्वास माझ्या पाठीशी देखील उभा केला आहे. अजित पवारांना आदरांजली वाहताना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी बारामतीकरांचे आभार मानते. माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. अजित पवारांनी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बारामतीकरांनी एवढे मतदान दिले आहे,” असे सुनेत्रा पवारांनी म्हटलं.
“बारामतीकरांना अशाप्रकारची निवडणूक हवीच नव्हती. ही वेळ जल्लोषाची नाही. आदरांजलीची आहे. अजित पवारांना जसे शिस्त आणि संयमाची सवय होती, त्याप्रकारे कार्यकर्त्यांनी दाखवावे, अशी विनंती करते. अचानक झालेल्या आघातामुळे मी निवडणुकीला उभे राहील, असे वाटले नव्हते. बारामतीकरांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी पूर्ण करायची आहे. ही माझी सुरूवात आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंनी ज्याप्रकारचे बारामतीत काम, विश्वास आणि सेवा केली आहे. एकंदर बारामतीकरांचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. तो विश्वास आजच्या मतातून दाखवला आहे,” असेही सुनेत्रा पवारांनी सांगितलं.
सुनेत्रा पवारांना किती मते?
२ लाख, १८ हजार ९३० मते
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला 'राष्ट्रमाता' असा…
महाराष्ट्र 14 न्यूज, २१ एप्रिल : हिंजवडी तसेच राज्यातील आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या नोकरीची असुरक्षितता, 'ले-ऑफ'च्या…
*एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी* *लघुउद्योग व उद्योग…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ एप्रिल २०२६*: शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका…