महाराष्ट्र 14 न्यूज : प्रत्येक व्यक्तीला जीवनात अमुक एका गोष्टीची आवड असते, किंवा त्याबाबतचा एखादा छंद असतो. अनेकदा हा छंद असा काही बळावतो की, त्या व्यक्तीची ओळखही त्याच्या छंदामुळं किंवा आवडीमुळं तयार होते. सध्या असंच काहीसं घडत आहे नाशिकमधील एका गृहस्थांसोबत. नाशिकच्या या गृहस्थांची चर्चा आहे त्यांच्याकडे असणाऱ्या अमाप सोऩ्याच्या दागिन्यांमुळे. हातात सोनं, गळ्यात सोनं इतकं असतानाच आता नाशिकमधील मकरंद साळी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून थेट सोन्याचा मास्कही बनवून घेतला आहे.
लहानपणी रामायण- महाभारत यांसारख्या मालिका टीव्हीवर पाहिल्या. त्यामध्ये दिसणाऱ्या देव-देवतांची सोन्याची आभूषणं पाहून आपणही अशी आभूषणं घालावीत अशी इच्छा झाली. बस्स…. तेव्हापासूनच ही आवड जोपासण्यासाठी म्हणून त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीला म्हणजेच १९८८ मध्ये ३ हजार रुपयांचा दर असताना साळी यांनी ७ ग्रॅम सोन्याची अंगठी बनवली होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…