महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : रेल्वे प्रवाशांना वैध तिकीट काढून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन करीत असते. परंतू तरीही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असतात. त्यामुळे तिकीट काढून सन्मानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असते. पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात अडीच लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७ कोटीच्या दंड वसूल केला आहे. यामध्ये ४.७१ कोटी रुपये दंड एकट्या मुंबई उपनगरी विभागात वसूल केला आहे.
दिवसेंदिवस लोकल व डेमूमध्ये तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोकल, डेमूसारख्या गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. आता ४० तिकीट पर्यवेक्षक वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरून प्रवाशांचे तिकीट तपासतील. ज्यांच्याकडे तिकीट नसेल, अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पुणे ते लोणावळा लोकलच्या रोज ४१ फेऱ्या होतात, तर पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २५० प्रवासी गाड्या धावतात. याच पार्श्वभूमीवर पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू तसेच हडपसर ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरमध्येही तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विना तिकीट प्रवास करताना प्रवासी आढळला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय, स्कॉडची देखील करडी नजर राहणार आहे. तेव्हा प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…