एस एम बी एस (SMBS)च्या सदस्यांनी मंगळागौर गणेश वंदना फॅशन शो अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण बाईपण भारी देवा चा डान्स होते. यावेळी संस्थेमधून सक्षम झालेल्या जवळपास दहापेक्षा जास्त लघु उद्योजिकांचा” एसएमएस सक्षम उद्योजिका “या पुरस्काराने गौरव केला.
तसेच येणाऱ्या काळात एसएमएस चे महिलांनी बनवलेले गृह उपयोगी वस्तू चे रुद्र उद्योग समूह नावाने टाय अप केलेजे लवकरच बाजारात आणि मॉल मध्ये दिसणार आहे यातून महिलांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळणार आहे.
तसेच संस्थेच्या संस्थापिका सौ राजश्रीताई गागरे यांनी सांगितले की भविष्यात एस एम एस चा महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचा मॉल लवकरच असणार आहे. एस एम बी एस चे डिजिटल ॲपही लवकरच येणार आहे . महिलांनी यावेळी महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत राहील आणि अजून सक्षम महिलांना संस्थेमध्ये जोडील अशी शपथ ही घेतली .
यावेळी प्रमुख पाहुण्या बोलल्या की अशी महिला सक्षमीकरणासाठी वास्तव स्वरूपात काम करणारी संस्था पाहून आनंद झाला. यावेळी संस्थेतील उत्तम ग्राहक म्हणून स्वाती कट्टे ,मीना आखाडे आणि माधवी जनार्दन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्तम विक्रेता म्हणून सोनल मलातपुरे, स्वाती हरगापुरे ,संगीता सुपल, संगीता क्षीरसागर आणि सोनल गराडे यांना गौरविण्यात आले. संस्थेचा आतापर्यंतचा दोन वर्षाचा प्रेरणादायी प्रवास पीपीटी द्वारे दाखविण्यात आला.
तसेच संस्थेमधील सक्रिय असणाऱ्या संगीताताई लांडे यांना एसएमएस आधारस्तंभ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी जवळपास 500 पेक्षा जास्त सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते आतापर्यंत संस्थेने जवळपास दीड हजार पेक्षा जास्त लघु उद्योजकांचा सदस्य टप्पा पार केला असून भविष्यात हा टप्पा निश्चितच वाढता असेल . यावेळी आर्किटेक्ट शिवानी गागरे ,विजयाताई राऊत तसेच डॉक्टर दिपाली कुलकर्णी ही उपस्थित होत्या.
सदस्यांनी संस्थेमधून कसा आत्मविश्वास आणि व्यवसाय वाढला हे मनोगत यावेळी व्यक्त केले. येणाऱ्या काळात समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचे झंजावाती महिला सक्षमीकरणाचे काम लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर करणार असे यावेळी संस्थेच्या संस्थापिका राजश्रीताई गागरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वाघ आणि मीनाताई आखाडे यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…