Categories: Uncategorized

अखेर रविंद्र महाजनींच्या सुनेने सोडले मौन; म्हणाली, ‘टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर..’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : मराठी सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली.

त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. मात्र इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत.

पण मी त्यांचा मुलगा होतो. तुमच्यापेक्षा जास्त मी त्यांना ओळखतो असे म्हणत गश्मीरने टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. तसेच योग्य वेळ आल्यावर भविष्यात मी नक्कीच याबाबत खुलासा करेन असेही गश्मीर महाजनीने म्हटले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गश्मीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

तरी गश्मीरची पत्नी गौरी ते सहन करत होती. पण आता तिने यावरचे मौन सोडले आहे. आता गौरीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये गश्मीर एका पुजेत बसलेला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

त्या फोटोच्या खाली कॅप्शन देत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. टोमण्यांच्या भट्टीमध्ये तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. मला कायमच गर्व आहे की तु माझा पती आहे, असे कॅप्शन तिने दिले आहे. तिने यातून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago