Categories: Editor Choice

नेहरुंच्या गालाचा मुका घेणारी ती तरुणी कोण? राज ठाकरेंनी सभेत सांगितलं सत्य … नेमकं काय म्हटले राज ठाकरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : आज मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी सावरकर, नेहरू वादावरून देखील सुनावलं आहे.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असताना त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाला. सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हटलं राज ठाकरे यांनी? गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. यावरून राज ठाकरे यांनी चांगलंच सुणावलं आहे. महापुराषांची बदनामी करणं थांबवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सावरकरांबद्दल बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी तरी आहे का? असा सवाल करतानाच दयेचा अर्ज ही सावरकारांची रणनीती होती. सावरकरांनी जेवढा त्रास भोगला तो इतर कोणीही भोगला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेहरुंवर टीका करणाऱ्यांना फटकारले दरम्यान यावेळी नेहरुंवर टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी फटकारलं आहे.

जाणून बूजून नेहरुंच्या गालाचा मुका घेणाऱ्या तरुणीचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. त्या फोटोवरून नेहरुंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी नेहरू यांच्या घराण्यातील होती. ती पंडित नेहरू यांची नात होती असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

राज ठाकरे यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे काही गोष्टी मुद्दामहून सांगण आवश्यक आहे. मनसेची स्थापना करून 16-17 वर्ष झाली. या काळात ज्या भूमिका घेतल्या, आंदोलनं केली, त्याचा यशस्वी होण्याचा रेट काढला तर इतर पक्षांच्या आंदोलनापेक्षा जास्त असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 16 वर्षात केलेल्या आणि यशस्वी झालेल्या आंदोलनाची पुस्तिका काढणार आहे.

रेल्वेचं आंदोलन असेल, महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्यासाठी आंदोलन असेल. युपी बिहारविरोधातील आंदोलन असेल, टोलनाके बंद करण्यासाठीचं आंदोलन असेल या सर्व विषयात मनसेची भूमिका स्पष्ट होती. यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला. आपलं वय काय? आपण बोलतो काय? पदाचा मान ठेवतो म्हणून बोलत नाही, नाहीतर महाराष्ट्रात शिव्याची कमी नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago