काही ठिकाणी सुट्टी दिवसभर तर काही ठिकाणी अर्धा दिवस किंवा चार ते दोन तास सुट्टी असते. मात्र काही कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्याऐवजी त्या दिवशी या सुट्टीचा उपयोग सहलीसाठी किंवा पर्यटन स्थळी जाण्यासाठी उपयोग करतात. म्हणजे एक प्रकारे सुट्टी एन्जॉय करतात. वास्तविक पाहता मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे आद्य कर्तव्य असते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परंतु आता यापुढे कोणालाही मतदानाचा हक्क बजावण्यास टाळाटाळ करता येणार नाही.
कारण यासाठी खुद्द निवडणूक आयोगाने एक योजना आखली असून त्यानुसार खासगी कंपन्यातील कंपन्यांबरोबर करार केला आहे त्यामुळे खाजगी कंपन्यातील व्यवस्थापन किंवा प्रशासन विभाग अशा कर्मचाऱ्यांनी मतदानात टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे प्रत्येकालाच्या पुढे मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मतदानाच्या दिवशीच्या सार्वजनिक सुट्टीचा अन्य कामांसाठी उपयोग करता येणार नाही.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने या उपक्रमासाठी हजाराहून अधिक कार्पोरेट कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार या खासगी कंपन्या मतदानाची सुट्टी घेणाऱ्या आणि मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्या नोडल अधिकारी नियुक्त करणार येणार असून सदर अधिकारी मतदान न करणाऱ्या नोकरदारांवर लक्ष ठेवणार आहे. मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव चक्क कंपनीच्या वेबसाईटवर झळकणार असून नोटीस बोर्डावरही अशा कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची बदनामी होईल, तसेच त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात येऊ शकते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…