Jalna : रावसाहेब दानवे, म्हणाले … महाविकास आघाडी सरकारमुळेच मराठा समाजावर …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९मे) : फडणवीस सरकारच्या काळात दिलेले आणि उच्च न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण आताच्या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. सरकार व त्यांच्या नेत्यांमध्ये नसलेला समन्वय, एक मत याचा परिणाम आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून आला. आरक्षण कायदा रद्द होण्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार व त्यांचे नेते जबाबादार असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

जालना येथे पत्रकारांशी बोलतांना दानवे यांनी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकायलाच पाहिजे होते, असा दावा करतांनाच सरकार बाजू मांडण्यात कमी पडले असा आरोपही केला. रावसाहबे दानवे म्हणाले, भाजपचे सरकार राज्यात असतांना फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मागसवर्ग आयोगाची समिती स्थापन करून गायकवाड समितीच्या अहवालाच्या निष्कर्षावरून आरक्षण दिले होते.

दरम्यान, आता ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा दिल्लीत देखील घुमणार आहे. कारण, मराठा समाजाचे प्रश्न देशासमोर मांडण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिन ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत पहिली गोलमेज परिषद घेणार असल्याचं शुक्रवारी संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी, राज्यातील सर्व आमदार-खासदार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित राहावं यासाठी मी आमंत्रित करतोय, असं भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

18 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

22 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago