Categories: Uncategorized

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ही मोठी घोषणा … ‘ तौकते ‘ वादळग्रस्तांना मिळणार दिलासा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२५मे) : ऐन कोरोनाच्या संकटात तौकते चक्रीवादळाने कोकणात मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचा दोन दिवसांत पंचनामा करून मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. वादळग्रस्तांना दिलेल्या या वचनाला जागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आज केली. तौकते चक्रीवादळामुळे कोकणात हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले.

घरे कोसळली, पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, त्याचप्रमाणे आंबा बागायतदारांचेही नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 21 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज झालेल्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच या वादळात नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना निकषांच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने मदत केली होती. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे फळबागांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये मदत मिळते. पण मागील वेळेस सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांपर्यंत मदत केली होती. त्यानुसार आता तौकते चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीच्या प्रस्तावावरही मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होऊन त्यांना मदत केली जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळापेक्षा तौकते चक्रिवादळाने अधिक तडाखा दिला. कोकण व किनारपट्टीच्या भागाचे एक हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानभरपाईचा आकडा पण वाढणार आहे. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना 700 कोटींहून अधिक मदत केली होती, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली.

 

 

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago