महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : नवी सांगवी तील फेमस चौक ते साई चौक या प्रभाग क्रमांक ३१ मधील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण चे काम मनपाच्या वतीने हाती घेण्यात आले होते, परंतु दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण चे काम करून मध्येच हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे, त्यामुळे या भागातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने तो खराब झाल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्यांना अनेक दिवस खड्ड्यास सामोरे जावे लागत आहे व दररोज अनेक अपघात होत असून अनेक महिला आणि जेष्ठ नागरिक घसरून पडले.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी याबद्दल मनपाला तात्पुरती मलमपट्टी करण्याची मागणी केली आहे.
जागा मालकांनीही नागरिकांची गैरसोय होऊ नये या करीता आराखड्यानुसार रस्ता करण्यास हरकत नसल्याचे मनपास कळविले आहे व तसे निवेदनही दिले आहे. मनपाच्या वतीने सदर ठिकाणच्या रस्त्याचे काम हे मनपा आराखड्यानुसार व्हावे अशी जागा मालकाने मागणी केली असल्याचे व सदर ठिकाणी भूसंपादन झाल्यावर काम करणे शक्य होईल असे कळविले, तसेच सध्या मनपाचा कारभार हा प्रशासकाच्या हाती असल्याने व पावसाळ्यात काम करता येत नसल्याने विलंब होत आहे, आता पावसाळा संपल्याने, काम होईल व अशी आशा नागरिकांना आहे, त्यामुळे मनपा कडे मलमपट्टी शिवाय पर्याय नाही, व ती केल्यामुळे तरी नागरिकांना दिलासा मिळेल.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…