Mumbai : मराठा आरक्षणावर राज्यसरकारच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणावर राज्य सरकार तीन पर्यायांवर विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय, असं देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर म्हणाले.

‘सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा. कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का? पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ आणि आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करू, असं आम्ही सरकारला सांगितलं आहे,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. ‘

आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही. सरकार घटनापीठाकडे जाणार आहे, त्याला आम्ही पाठिंबा देऊ,’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच आंदोलन हिंसक करु नये, महाराष्ट्र शांत कसा राहील याच भान ठेवा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. ‘सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या तर संधी मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी,’ अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

8 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago