महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ डिसेंबर) : रयत स्वाभिमानी संघटनेची आढावा बैठक सोमवार दि. 26 डिसेंबर सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथे आयोजीत करण्यात आली होती.अशी माहिती रविराज काळे सरचिटणीस यांनी दिली.
रविराज काळे म्हणाले, आज अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. येथील कोणत्याही लोकप्रतिनिधींना ही युवा शक्ती विधायकतेने परिपूर्ण बनावी असे वाटत नाही. त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच आज जिल्ह्यातील औद्योगीकरण ओसाड पडताना आपण पहात आहोत. जनतेने यांना पाच वर्षे सेवेची संधी दिली असताना हे लोकप्रतिनिधी उदासिन भावनेतून या तरुणांना भविष्याची व्होट बँक समजून हे तरुण आपल्याच दारात कसे घुटमळत राहतील, बेकार कसे बनतील यासाठीच सदैव प्रयत्नशील राहिलेले आपण पहात आहोत, असे असताना आज सातारा जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी ही रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून बदलण्यासाठीचे संकेत निर्माण होवू लागले आहेत. कुटुंब वत्सल, कार्यक्षम आणि संस्कारशिल विचारधारा निर्माण करण्यासाठीच शिव, फुले,शाहु, आंबेडकर यांचे सामाजिक सहिष्णुतेचे विचार जनमाणसात पोहचवण्यासाठी माझ्यासह सर्वच सहकारी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही रविराज काळे यांनी दिली.
ते म्हणाले, युवकांच्या युवा शक्तीला विधायक चेतनेच्या उत्कर्षाप्रती पोहचवण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . यासाठी सर्वच पदाधिकारी वर्ग बहुसंख्येने सहभागी होवून आपले कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन रविराज काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…