Categories: Uncategorized

पुणे जिल्ह्याला पावसाचा तडाखा, आभाळ फाटलं, आंबेगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) :  एक ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळं पुण्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळं वरुणराजाचं पुनरागमन झाल्याने आनंद व्यक्त करावा की पावसामुळं शेतीचं नुकसान झालं, याचा शोक व्यक्त करावा, असा प्रश्न पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. तीन वाजता सुरू झालेला पाऊस संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सुरू होता. आंबेगाव तालुक्यातील काठापूर मध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी अनेक शेतातील बांध फुटले असून उभी पीकं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. शेतीपिकांचं नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून बळीराजाला आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

महिन्याभरानंतर वरुणराजाचं आगमन झाल्याने आम्ही समाधानी आहोत, परंतु या पावसामुळं शेतीपिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उगवत असलेली पीकं नाहीशी झाली आहे. हाती आलेल्या पिकांनाही पावसामुळं मोठा झटका बसला आहे. याशिवाय अनेक नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे देखील पिकांचं नुकसान होत असल्याची भावना आंबेगावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे…

2 weeks ago

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे -- ​पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण…

3 weeks ago

सोसायटीवरील ‘ॲमिनेटीज्‌’ कर आकारणी रद्द करा! – चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी – महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 मे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सोसायट्यांमधील…

4 weeks ago

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

1 month ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा…

1 month ago