Categories: Uncategorized

पर्यावरण जागृतीसाठी पुणे ते कन्याकुमारी ‘सायकल वारी’ – सायकलपटू जितीन इंगवले यांची विधायक मोहीम – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले कौतूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : आपण प्रगती साधत असताना, आपल्याकडून कळत-नकळत निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असताना, झाडांची कत्तल केली जाते. आगामी काळात स्वच्छ हवेचा प्रश्न गंभीर होणार आहे. पर्यावरणाचे सरंक्षण करावे, याची जनजागृती करण्यासाठी सायकलपटू जितीन इंगवले यांनी ‘पुणे ते कान्याकुमारी सायकल मोहिम’ यशस्वी केली.
पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटू जितीन इंगवले व त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी ‘पर्यावरण’ या संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देश्याने दि. १६ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुणे ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये त्यांनी १५५० किमीचे अंतर त्यांनी या दहा दिवसात पूर्ण केले. एका दिवसात सुमारे दीडशे किमीचा टप्पा ते रोज पार करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून त्यांनी प्रवास केला.

पहाटे ५ वाजता ते सायकल चालविण्यास सुरुवात करत असत. हा १५० किमीचा टप्पा गाठण्यासाठी रोज किमान १० ते ११ तास त्यांना सायकल चालवावी लागत असे. या मोहिमेत जितीन इंगवले यांच्यासह सुनील अडसूळ, संजय टिळेकर, चंद्रकांत ववले, संतोष दरेकर, संदीप बोडके, विनोद बोडके, गणेश गोरे, आशुतोष देसले, सुमीत पवार, रामदास दरेकर, अनिकेत इंगवले यांच्यासह वाहन सहाय्यक संतोष इंगवले सहभागी झाले होते.

जितीन इंगवले म्हणाले की, या मोहिमेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सर्वजन दररोज किमान ३०-४० किमीचा तर आठवड्यातून एक दिवस १०० ते १२० किमी प्रवास करताना या मोहिमेचा सराव केला. यामुळेच ही अवघड मोहिम पूर्ण करण्यात आम्ही सर्वजन यशस्वी झालो आहोत.

सायकलपटू जितीन इंगवले आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी एवढी मोठी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली याबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन. मनाचा निग्रह आणि सरावातील सातत्य या दोन गोष्टींच्या जोरावर एवढी मोठी मोहीम पूर्ण करण्यात या सर्वांना यश मिळाले आहे. या मोहिमेतून त्यांनी ‘पर्यावरण वाचविण्याचा’ संदेश देखील महत्वपूर्ण आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

4 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

4 weeks ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

4 weeks ago