पहाटे ५ वाजता ते सायकल चालविण्यास सुरुवात करत असत. हा १५० किमीचा टप्पा गाठण्यासाठी रोज किमान १० ते ११ तास त्यांना सायकल चालवावी लागत असे. या मोहिमेत जितीन इंगवले यांच्यासह सुनील अडसूळ, संजय टिळेकर, चंद्रकांत ववले, संतोष दरेकर, संदीप बोडके, विनोद बोडके, गणेश गोरे, आशुतोष देसले, सुमीत पवार, रामदास दरेकर, अनिकेत इंगवले यांच्यासह वाहन सहाय्यक संतोष इंगवले सहभागी झाले होते.

जितीन इंगवले म्हणाले की, या मोहिमेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सर्वजन दररोज किमान ३०-४० किमीचा तर आठवड्यातून एक दिवस १०० ते १२० किमी प्रवास करताना या मोहिमेचा सराव केला. यामुळेच ही अवघड मोहिम पूर्ण करण्यात आम्ही सर्वजन यशस्वी झालो आहोत.
सायकलपटू जितीन इंगवले आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी एवढी मोठी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली याबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन. मनाचा निग्रह आणि सरावातील सातत्य या दोन गोष्टींच्या जोरावर एवढी मोठी मोहीम पूर्ण करण्यात या सर्वांना यश मिळाले आहे. या मोहिमेतून त्यांनी ‘पर्यावरण वाचविण्याचा’ संदेश देखील महत्वपूर्ण आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.