यामुळे अयोध्येसह देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी हे चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.
पंतप्रधान मोदी 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत. गोविंददेव महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.
या तीन दिवसात आहार म्हणून फक्त फळांचे सेवन करतील. पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की, त्यांना काय करावं लागणार आहे. कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींकडून यावेळी दानही केले जाणार आहे. त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील. त्याचे पूजन करण्यात येईल. प्राण प्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल मिश्रा असतील. त्यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावे लागणार आहेत. मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे. त्या मूर्तींचे पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…