महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ सप्टेंबर) : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. त्याविरोधात महायुती वगळून महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष आणि संघटनांकडून जोरदार निदर्शने सुरू असून बंदही पाळला जात आह. तसाच तो येत्या शनिवारी (ता. ९) पिंपरी-चिंचवडमध्ये पाळला जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने करत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेल्या ५८ मूक मोर्चे महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत. यामागणीसाठी आजवर ४२ च्या वर तरुणांनी आत्मबलिदान दिले आहेय परंतु ही न्याय्यी मागणी आजवर कोणतेही सरकार पूर्ण करू शकले नाही. मराठा समाजाला कुणावरही अन्याय करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ. बी. सी. प्रवर्गातून हवे आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग उपस्थित होता. सदर आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून मराठा आंदोलकांवर जालना येथे अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, याच्या निषेधार्थ शनिवार दि.०९ सप्टेंबर २०१३ रोजी शांततेच्या मार्गाने पिंपरी-चिंचवड शहरात मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
यामध्ये शेकडो माता-भगिनी, लहान मुले व ज्येष्ठ आंदोलक जखमी झाले. यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड चीड आहे. निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामधून आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, शनिवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पिंपरीगाव येथून महाराजांना अभिवादन करून शांततेत आंदोलनास सुरूवात होणार आहे. सर्व आंदोलक व समाज बांधव पिंपरीगाव येथून पायी मोर्चाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जाणार आहे. या ठिकाणी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे धरून निषेध आंदोलने करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत.
या पत्रकार परिषदेला गौतम चाबुकस्वार, प्रकाश जाधव, सतिश काळे, कैलास कदम, सचिन चिखले, शिवाजी पाडुळे, धनाजी येळकर, सचिन भोसले, काशिनाथ नखाते, प्रविण कदम, जितू दादा पवार, नकुल भोईर, जिवन बोराडे, मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे, गणेश सरकटे, सुनीता शिंदे, संदिप नवसुपे, विनायक रणसुभे, वैभव जाधव, अभिषेक म्हसे, सागर तापकीर गणेश जाधव यांच्या सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…