Categories: Uncategorized

‘ना नेता ना पक्ष’ ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे : राहुल कलाटे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ फेब्रुवारी २०२३) : चिंचवड विधानसभा निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या मतदार संघात प्रचारा दरम्यान बोलताना राहुल कलाटे म्हणाले, ” निष्ठुर भाजपने सहानुभूती या शब्दाचा गळा घोटला आहे. त्यामुळे त्यांना लोकांची सहानुभूती मुळीच मिळणार नाही, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केले. चिंचवडचा विकास केला म्हणणाऱ्यांनी आधीच विकास झालेल्या भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केल्याचा केवळ भास निर्माण केला हे न ओळखण्याइतकी जनता दूधखुळी नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिट्टी या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.

राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवडमधील जनता माझ्याबरोबर आहे, या आधीच्या निवडणुकांचा निकाल पाहिला तर जनता मला नक्कीच संधी देईल. ‘ना नेता ना पक्ष’ ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. चिंचवडची जनता मलाच कौल देईल असा विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला. आता या तिहेरी लढतीचा फायदा भाजपला होईल असे बोलले जाते त्याबद्दल विचारले असता तिहेरी लढतीचा फायदा सक्षम उमेदवार म्हणून मलाच होईल, असे कलाटे म्हणाले. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सहानुभूती असल्याकडे लक्ष वेधले असता कलाटे म्हणाले की, मलाही सहानुभूती आहे. सन २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मी लक्षणीय मते घेतली आहेत. त्यामुळे आता मला सहानुभूती मिळेल. मागील निवडणुकीत मतदारांनी खुद्द लक्ष्मण जगताप समोर असताना मला एक लाख बारा हजार मते दिली होती; याची आठवण कलाटे यांनी यावेळी करून दिली.

वाकडमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण अनेक विकास कामे मंजूर करून आणली व मार्गी लावली. या उलट भाजपने बंद जलवाहिनी प्रकल्प, रेड झोन सारखे प्रश्न लोंबकळत ठेवले आहेत. हे जनतेला पक्के माहित आहे त्यामुळे यावेळी चिंचवड मतदार संघात इतिहास घडेल व सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

चिंचवडचा विकास केला असा दावा करणाऱ्या मंडळींनी स्मार्ट सिटी अंतर्गत काय विकास केला हे चिंचवड मतदार संघातीलच नव्हे तर अख्ख्या पिंपरी चिंचवड मधील जनतेला माहित आहे. आधीच विकसित झालेल्या भागावर उधळपट्टी करण्याऐवजी रहाटणी ,काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी सारख्या भागाचा विकास केला असता तर मतदार संघाचा समतोल विकास झाला असता, असे कलाटे म्हणाले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

4 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

1 month ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

1 month ago