महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. जर २० सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. नुकतंच पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला रामभाऊ गायकवाड, धनाजीराव साखळकर, सागर यादव, किरण घाडगे, संदीप मांडवे यांनी हजेरी लावली. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाला.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती देत आरक्षणाचे लाभ थांबवले आहेत. या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच युवकांना नोकरीसाठी आरक्षण उपयुक्त आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला आता अल्टिमेटम दिला आहे. जर 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर 21 सप्टेंबरपासून मराठा समाजाच्या रोषाला सरकारला तयार रहावे लागेल. मराठा समाजातील अनेक लोक गनिमी काव्याने समाजातील आंदोलन करतील. याची सगळी जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…