Categories: Uncategorized

आता कुटुंबातील 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१६ सप्टेंबर) : भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत (आरोग्य विमा योजना) अंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांनी सांगितले की, ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल. या योजनेंत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल.

केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मोठी निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत ७० वर्षापेक्षा अधिक वृद्ध व्यक्तींसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रा सरकारच्या या निर्णयानंतर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, AB PM-JAY चे लाभ दिले जातील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल

केंद्रीय मंत्रिमंडळात 6 मोठे निर्णय घेण्यात आले. आयुष्मान भारत अंतर्गत ७० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज दिले जाईल. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळात आणखी पाच मोठे निर्णय घेण्यात आले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago