महाराष्ट्र 14 न्यूज : ऑनलाइन अभ्यात येत असलेल्या अडचणींच्या विवंचनेतून बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावात समोर आली आहे. रेवती संजय वच्छाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थींचे नाव आहे. ती सटाणा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती बेताचीच. घरात एकच मोबाईल आणि शिकणारी तीन भावंडे. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाईल मिळत नसल्याने आपला अभ्यास अपूर्ण राहील, या भीतीपोटी तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.
रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नसल्याने रेवतीने विषारी औषध घेवून आपले जीवन संपवले. सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शासन आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…