दरम्यान 5 जीसाठी धोरणात बदल करण्याची आणि प्रक्रियेला वेग देण्याची आवश्यकता असल्याचेही अंबानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, जोपर्यंत धोरण सोपे आणि स्वस्त केले जात नाही तोपर्यंत ते शक्य नाही. त्याच वेळी, भारतात 30 कोटी 2 जी फोन ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये आणण्याविषयीसुद्धा त्यांनी भाष्य केले आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, 2021 मध्ये जिओ भारतात 5 जी क्रांती घडवून आणेल. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर व तंत्रज्ञानही स्वदेशी असेल. आम्ही जिओच्या माध्यमातून स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करू. जिओ 5 जी क्रांतीचे नेतृत्व करेल. पुढे बोलताना अंबानी म्हणाले की, भारताने 5G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. भारत येत्या काही दिवसांत सेमी कंडक्टर मैन्युफैक्चरिंग हब बनू शकेल. आपण केवळ सेमी कन्डक्टरच्या आयातीवर अवलंबून राहू शकत नाही.
अंबानी म्हणाले की या 2 जी ग्राहकांना डिजिटल बदलांचा फायदा घेता येणार आहे. आज भारत हा जगातील सर्वाधिक ‘डिजिटली कनेक्ट’ देश आहे. ते म्हणाले की, आजही देशातील 30 कोटी ग्राहक टू-जीमध्ये अडकले आहेत आणि त्यांना स्मार्टफोनमध्ये आणण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हे ग्राहक डिजिटल व्यवहारही करु शकतील.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…