मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ५ ऑगस्टपासून पाणी कपातीचे संकट !

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाच ऑगस्टपासून वीस टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्या मुळे मुंबईच्या विविध भागांत पाणीटंचाईची समस्या भासणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पाणी टंचाईचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांत फक्त सुमारे ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास पावसाळ्यानंतरही महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्ध होऊ शकणार नसल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत पाणी पुरवठा ३१ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे, भिवंडी महानगरपालिकांसह इतर गावांमध्येसुद्धा पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. सर्व नागरिकांना या कालावधीत जपून पाण्याचा वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासनातर्फे केलं आहे.

सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेची अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार व तुळशी ही सहा धरणे असून भातसा हे राज्य सरकारचे धरण आहे. सरकारला रॉयल्टी भरून पालिका भातसा धरणातून पाणी उचलते. सहा धरणांपैकी विहार व तुळशी ही तुलनेने खूपच लहान धरणे असून त्यांचा पाणीसाठा काही दिवस पुरेल इतकाच असतो. त्यामुळे सर्व भार अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा व मोडकसागर या धरणांवर आहे. मागीलवर्षी झालेल्या पावसात सात धरणांमध्ये मिळून क्षमतेच्या ८२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

16 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 day ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 day ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

7 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago